मराठी सामान्य ज्ञान प्रश्न General knowledge questions
1) इटली या देशाची राजधानी कोणती ?
रोम
2) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग समृद्धीचे प्रतीक आहे ?
हिरवा
3) भारतात सध्या उच्च न्यायालय किती आहेत ? 25
4) नेपाळ या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
गाय
5) नवीन 200 रुपयाच्या नोटांवर कशाचे चित्र आहे ?
सांची स्तूप
1) अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?
गुरुशिखर
2) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 केव्हापासून अंमलात आला ?
17 ऑक्टोबर 2000
3) ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ कोणत्या वर्षांपासून दिला जातो ?
1955
4) देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता ?
परमवीर चक्र
5) देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळ पुरस्कार कोणता ?
अर्जुन पुरस्कार
1) जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?
ग्रीनलँड
2) जर्मनी या देशाची राजधानी कोणती ?
बर्लिन
3) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग शांतीचे प्रतीक आहे ?
पांढरा
4) राष्ट्रध्वजावरील अशोकचक्रात किती आरे आहेत ?
24 आरे
5) भारतीय चलनी नोटांवर किती भाषांचा उल्लेख आहे ?
15
1) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?
राष्ट्रपती
2) ‘अग्निपंख’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
डॉ ए पी जे अब्दुल कलाम
3) जगातील सर्वात मोठे पठार कोणते ?
तिबेटचे पठार
4) जगातील सर्वात उंच इमारत कोणती ?
बुर्ज खलिफा
5) जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?
भारत
1) संसदेच्या प्रथम सभागृहास काय म्हणतात ?
लोकसभा
2) संसदेच्या द्वितीय सभागृहास काय म्हणतात ?
राज्यसभा
3) राज्यसभेचा सभापती कोण असतो ?
उपराष्ट्रपती
4) भारतीय संघराज्याचा प्रमुख कोण असतो ?
राष्ट्रपती
5) राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
5 वर्ष
1) 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण किती आहे ? 940
2) महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या किती ?
67
3) भारतात वनांखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे ?
मध्यप्रदेश
4) ‘जन्मलेल्या शिशूला आरोग्य सुविधा’ हा कोणत्या योजनेचा मुख्य हेतू आहे ?
वात्सल्य योजना
5) 1853 साली सुरू झालेल्या रेल्वेचे पहिले प्रवासी कोण होते ?
नाना शंकरशेठ
1) संविधान समितीत किती सदस्यांचा समावेश होता ?
299
2) संविधानाचा मसुदा कोणी तयार केला ?
डॉ बाबासाहेब आंबेडकर
3) संविधानाच्या प्रस्तावनेला काय म्हणतात ?
प्रास्ताविका / उद्देशपत्रिका
4) लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
5 वर्ष
5) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
6 वर्ष
1) चोवीस तास ऑक्सिजन पुरवठा करणारा वृक्ष कोणता ?
पिंपळ
2) गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरते ?
लोकसंख्या
3) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ‘उद्योग जिल्हा’ म्हणून घोषित करण्यात आले ?
रायगड
4) ‘राज्यात प्रत्येक गावात एकतरी शाळा असली पाहिजे’ ही आज्ञा कोणी काढली ?
छत्रपती शाहू महाराज
5) भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?
ज्ञानपीठ पुरस्कार
1) ‘लाल-बाल-पाल’ असे कोणाला म्हटले जाते ? लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बीपीनचंद्र पाल
2) ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
लोकमान्य टिळक
3) ‘भारत सेवक समाजा’ची स्थापना कोणी केली ?
ना गोपालकृष्ण गोखले
4) गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी कोणते गाव निश्चित केले ?
दांडी (गुजरात)
5) ‘स्वातंत्रवीर’ कोणाला म्हटले जाते ?
विनायक दामोदर सावरकर
1) रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते ?
वटवृक्ष
2) भावी पिढीचा शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?
शिक्षक
3) ‘खेड्याकडे चला’ अशी हाक कोणी दिली ?
महात्मा गांधी
4) ऑलिम्पिक ध्वज सर्वात प्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आले ?
1920 (बेल्जियम)
5) 1 एकर म्हणजे किती आर ?
40 आर
1) मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता ?
चंद्रगुप्त मौर्य
2) प्रसिद्ध लाल किल्ला कोठे आहे ?
दिल्ली
3) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीहून कोणाला बोलावण्यात आले होते ?
गागाभट्ट
4) शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता ?
बहिर्जी नाईक
5) ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ?
इस 1600
1) पंचायत राजची व्यवस्था कोणत्या साली अस्तित्वात आली ?
1962
2) शेतकऱ्यांना 7/12 व 8-अ चे उतारे कोण देतो ?
तलाठी
3) महसूल खाताचा वर्ग-2 चा अधिकारी कोण असतो ?
तहसीलदार
4) ‘तालुका दंडाधिकारी’ म्हणून कोण काम पाहतो ?
तहसीलदार
5) ‘ऑस्कर’ या पुरस्कारासाठी नामांकन झालेला पहिला मराठी चित्रपट कोणता ?
श्वास (2004)
1) भारताची राष्ट्रीय लिपी कोणती ?
देवनागरी
2) भारताचा जगप्रसिद्ध बुद्धीबळपटू कोण ?
विश्वनाथन आनंद
3) 1 टन म्हणजे किती क्विंटल ?
10 क्विंटल
4) पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी झाल्या ?
इस 1896
5) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा मुख्यालय कोठे आहे ?
लुसाने (स्वित्झर्लंड)
1) आशिया खंडातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?
सिंद्री (झारखंड)
2) मुंग्यांच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?
वारूळ
3
) पक्ष्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?
घरटे
4) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय ?
मुरलीधर देविदास आमटे
5) अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय ?
किसन बाबुराव हजारे
1) हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ?
14 सप्टेंबर
2) केळीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
तामिळनाडू
3) भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?
हिराकुंड
4) कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?
जिराफ
5) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे ?
वाशिंग्टन
1) विधानपरिषदेच्या सभासदांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
6 वर्ष
2) मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणती ?
औरंगाबाद, नागपूर, पणजी
3) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?
राष्ट्रपती
4) राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण असतो
पोलीस महासंचालक
5) जिल्हा पातळीवर कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ?
जिल्हा पोलीस अधीक्षक
1) जागतिक जलदिन केव्हा साजरा केला जातो ?
22 मार्च
2) भारतातील सर्वात मोठा व्याघ्र अभयारण्य कोणता ?
कार्बेट
3) हिवताप कोणत्या डासांमुळे होतो ?
अनाफेलीस डास (मादी)
4) चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त आदिवासी जमात कोणती ?
गोंड
5) लिएण्डर पेस हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
टेनिस
1) ‘राष्ट्रीय युवक दिन’ केव्हा साजरा केला जातो ?
12 जानेवारी
2) विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
5 वर्ष
3) विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतात ?
आमदार
4) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते ?
नागपूर
5) राज्याचा प्रमुख कोण असतो ?
राज्यपाल
1) ‘जागतिक साक्षरता दिवस’ केव्हा साजरा केला जातो ?
8 सप्टेंबर
2) ‘जागतिक साक्षरता दिवस’ कोणत्या वर्षीपासून साजरा केला जातो ? 1966
3) रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते ?
स्वावलंबी शिक्षण
4) स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचे नाव काय ?
रामकृष्ण परमहंस
5) गगन नारंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
शुटींग
1) ‘शिक्षक दिन’ केव्हा साजरा केला जातो ?
5 सप्टेंबर
2) शिक्षक दिन कोणाच्या जन्म दिवसानिमित्त साजरा केला जातो ?
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन
3) जगात किती देशात शिक्षक दिवस साजरा केला जातो ?
100
4) भारतात कोणत्या वर्षी प्रथम शिक्षक दिवस साजरा केला गेला ?
1962
5) डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म केव्हा झाला ?
5 सप्टेंबर 1888
1) भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?
सरदार पटेल
2) ‘सामाजिक न्याय दिन’ केव्हा साजरा केला जातो ?
26 जून
3) ‘कमवा व शिका’ या संकल्पनेचे जनक कोण ?
कर्मवीर भाऊराव पाटील
4) जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?
राज्यपाल
5) कोणत्या क्रिकेटपटूने एकदिवसीय सामन्यात तीन वेळा द्विशतक झळकविण्याचा पराक्रम केला ?
रोहित शर्मा
1) ‘होमरुल लीग’ ची स्थापना कोणी केली ?
डॉ अँनी बेझंट
2) शिवसेनेचे पक्षप्रमुख कोण आहेत ?
उद्धव ठाकरे
3) वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेत हवेतील कोणता वायू शोषून घेतात ?
कार्बन डायआक्साईड
4) भारतात सर्वप्रथम सूर्योदय व सूर्यास्त कोणत्या राज्यात होते ?
अरुणाचल प्रदेश
5) ‘द वाल’ असे कोणत्या क्रिकेट खेळाडूला म्हटले जाते ?
राहुल द्रविड
1) भारताचे कृषिमंत्री कोण आहेत ?
मा. राधामोहन सिंह
2) ‘देवीची लस’ कोणी शोधून काढली ?
एडवर्ड जेन्नर
3) रक्तगट कोणी शोधून काढले ?
कार्ल लँडस्टेनर
4) भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात ?
लोकमान्य टिळक
5) पी व्ही सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
बॅडमिंटन
1) महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत ?
भगत सिंह कोश्यारी
2) ‘अँटीरेबीज लस’ कोणी शोधून काढली ?
लुई पाश्चर
3) हृदयरोपणाचे जनक कोणाला म्हटले जाते ?
ख्रिश्चन बर्नाड
4) आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते ?
राजाराममोहन राय
5) आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात ?
केशवसुत
1) महाराष्ट्राचे कृषिमंत्री कोण आहेत ?
मा. सदाशिव खोत
2) आनंदवनाची स्थापना कोणी केली ?
बाबा आमटे
3) मुलींची पहिली शाळा कोणी काढली ?
महात्मा फुले
4) ‘पोलिओची लस कोणी शोधून काढली ?
साल्क
5) कर्नाटक या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?
नीलकंठ
1) श्वसनासाठी आपण कोणता वायू घेतो ?
ऑक्सिजन
2) ऑलिम्पिक खेळ दर किती वर्षांनी होतात ?
4
3) शरीराच्या हालचालीवर कोण नियंत्रण ठेवतो ?
मेंदू
4) कथकली हे कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?
केरळ
5) गौतम बुद्धाची जन्मभूमी कोणती ?
लुम्बिनी (नेपाळ)
1) चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण ?
नील आर्मस्ट्राँग
2) भारतात सर्वात शेवटी तयार झालेले राज्य कोणते ?
तेलंगाणा
3) सर्वात जास्त लोकसंख्येचा देश कोणता ?
चीन
4) सूर्य किरणांपासून कोणते जीवनसत्त्व मिळते ?
‘ड’
5) लीप वर्षात किती दिवस असतात ?
366
1) उडीसा या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?
मोर
2) शिवाजी महाराजाची समाधी स्थळ कोठे आहे ?
रायगड
3) तापमापकामध्ये कशाचा वापर करतात ?
पारा
4) तंबाखूमध्ये सर्वात जास्त विषारी पदार्थ कोणता ?
निकोटिन
5) भारतीय खेळातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
1) भारतात केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे ?
9
2) ‘दासबोध’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
समर्थ रामदास
3) शिवाजीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली ?
रायरेश्वर मंदिर
4) महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते ?
पुणे
5) पहिले सजीव कोठे निर्माण झाले ?
पाण्यात
1) समर्थ रामदासाचे मूळनाव काय होते ?
नारायण
2) शिवाजीचे ‘शिवाजी’ हे नाव कशावरून ठेवले ?
शिवनेरी किल्यावर जन्म झाला म्हणून
3) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग त्यागाचे प्रतीक आहे ?
केशरी
4) महाराष्ट्रातील सर्वात मोठा उद्योग कोणता ?
कापड
5) भारतातील मानव निर्मित सर्वात मोठी वास्तू कोणती ?
ताजमहाल
1) गुजरात या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?
रोहित
2) फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात ?
सुरवंट
3) वाघाच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?
गुहा
4) वर्षातील कोणत्या दिवशी दिवस व रात्र सारखेच असते ?
22 मार्च व 22 सप्टेंबर
5) महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली ?
श्री चक्रधर स्वामी
1) महाराष्ट्राचे राज्यफुलपाखरू कोणते ?
राणी पाकोळी
2) घोड्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?
तबेला
3) जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?
मौसीनराम व चेरापुंजी (भारत)
4) शुद्ध पाण्याला काय नसते ?
रंग, वास, चव
5) पाण्याच्या अवस्था किती व कोणत्या ?
3 ( स्थायू, द्रव, वायू)
1) ‘टायगर स्टेट’ असे कोणत्या राज्याला म्हणतात ?
मध्यप्रदेश
2) शुद्ध हवेला काय नसते ?
रंग, वास, चव
3) ज्ञानेंद्रिये किती व कोणते ?
5 (डोळे, कान, नाक, जीभ, व त्वचा)
4) ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
महात्मा फुले
5) ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ केव्हा साजरा केला जातो ?
11 नोव्हेंबर