छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषणे 2024 chatrapati Shivaji Maharaj jayanti shivjayanti 2024

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषणे 2024 chatrapati Shivaji Maharaj jayanti shivjayanti 2024

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे व माझे गुरुजन वर्ग आज मी तुम्हाला स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेचे ऐकून घ्याल अशी मी विनंती करतो.

आज आपल्या शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यची जयंती साजरी करत असताना मला अतिशय आनंद होत आहे की मला या कार्यक्रमांमध्ये माझे मनोगत व्यक्त करण्याचे आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल प्रथमता मी आयोजकांचे खूप आभारी आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी बोलायचे झाले तर

मित्रानो साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्वान वीरपुत्र मिळाला. ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होत करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला.

त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रु लुटली जात होती. अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांच्या कोणी कैवारी नव्हता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, जगमता पेटता अंगार. आणि अखेर ती वेळ आली. सहियाद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी वर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजाला. ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला…. ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला….

गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस केले व ते पूर्णत्वास नेले. यासाठी त्यांनी पुणे, मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली. सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या. त्यांच्या मनात स्वराज्य बद्दल आस्था निर्माण केली. या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, मुरारबाजी, येसाजी कंक यासारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राण्यांचीही बलिदान देतांना मागेपुढे पाहिले नाही.

शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायां नंतरही अनेक राजे उदयास आले. पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त शिवाजी महाराज. याचे कारण आहे त्यांचे स्वराज्य बद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चारित्र्य. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आर्ड समान मानणारे शिवाजी महाराज हे

परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते. शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावळ्यासोबत स्वराज्यासाठी दिवस-रात्र झटायचे.

जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता.

जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता.

स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेनं काळजी घेणारा

फक्त माझा शिवबा होता फक्त माझा शिवबा होता!!

शिवाजी महाराज हे एक सर्वगुण संपन्न असे व्यक्ती होते. काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत, कितीही संकटे आले तर डगमगून न जाता त्यावर शिताफीने मात करत. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलाढ्य शत्रूशी लढा देत एका वीर पुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले.

आशा या महान राजा माझा मानाचा मुजरा

➖➖➖➖➖➖➖◼️➖➖➖➖➖➖➖

भाषण क्र.2 छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण 2024

आज आपल्या शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण साजरी करत आहोत त्या जयंतीच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे व माझे गुरुजन वर्ग तसेच इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज विषयी व स्वराज्य विषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेत ऐकन घ्या ही नम्र विनंती करते

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर संपूर्ण देशात व देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्यात उत्साहाने साजरी होत आहे, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, अश्या अनेक उपक्रमाने आज जयंती साजरी होताना दिसत आहे.

गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची तोडमोड केली जात आहे महाराष्ट्राच्या अनेक संघटनांनी आपापल्या परीने शिवचरित्र जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते. आजचे राजकीय पक्ष मात्र आपल्या सत्तेसाठी त्यांचा उपयोग करताना दिसत आहेत. तारीख, तिथीच्या वात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमतो आहे, दुर्दैव या मातीच आज त्यांच्याच मातीत, त्यांच्याच स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज हे एक राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोगी पडणारे समीकरण ठरलेले आहे. आजचे रजनेते शिवरायांच्या नावाने मतपेटीत मतांची भीक मागत फिरत आहेत.

मावळ्यांनो छत्रपती शिवाजी महाराज राजकीय लढवय्ये नक्कीच होते. परंतु, विशिष्ट एखाद्या पक्षांसाठी मर्यादित नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे एखाद्या विशिष्ट जाती धर्मासाठी संघर्ष करणारे राजे नव्हते. आपल्याच महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या महापुरुषांच्या जन्मतारखे वरून वाद पेटवला जातो, जाती-धर्मात शिवरायांना गुंतवून ठेवले जाते, ही लाजिरवाणी बाब आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिवरायांची निती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचे संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजावून शिवशाही अमलात आणणे काळाची गरज आहे. शिवाजी महाराजांचा संघर्ष हा कुठला जात व धर्म संघर्ष

नव्हता. तर शिवाजी महाराजांचा संघर्ष रयतेच्या राज्यासाठी होता. शिवराय सर्व जाती धर्माचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या स्वराज्यात जाती धर्माला थारा नव्हता.

जगात शिवनीतीचा वापर करून अनेक योद्धे लढाई जिंकण्याची उदाहरणे आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात, जर शिवाजी महाराजांच्या देशात जन्माला आले असते, तर आम्ही त्यांना सूर्य संबोधले असते. या महाराष्ट्रात शिवरायांचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे.

इंग्रजांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले. परंतु, जाताजाता इंग्रज गव्हर्नर म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज जर आणखी 10 वर्षे जगले असते, तर इंग्रजांना हिंदुस्तानच्या चेहरा पाहता आला नसता.. असे होते आमचे रयतेचे राजा छत्रपती शिवराय.!

आजच्या युवा वर्गाने वरील गोष्टींचे चिंतन करावे. केवळ दाढीमिशी वाढवून कपाळावर चंद्रकोर लावून कोणी शिवाजी होत नसते, शिवाजी होण्यासाठी जिजाऊंचे संस्कार, इतरांविषयी प्रेम व महिलांविषयी आदर हवा. मावळ्यांनो आज गरज आहे हे समजून घेण्याची कि मी या स्वराज्याचा आहे आणि स्वराज्य माझ आहे.

जय भवानी जय शिवाजी

➖➖➖➖➖➖◼️➖➖➖➖➖➖

भाषण क्र.3 शिवजयंती-2024 जबरदस्त भाषण 

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्रांनो मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल ही नम्र विनंती.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला. शिवजयंती तारखेप्रमाणे आणि त्यासोबतच तिथीप्रमाणे सुद्धा साजरी करण्यात येते. तिथीनुसार, यंदाच्या वर्षी शिवजयंती 28 मार्च 2024 रोजी आहे. शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते.

शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि या गडावर असलेल्या शिवाई देवीमुळे जिजाबाई यांनी शिवरायांचे नाव शिवाजी ठेवले. जिजाऊ यांनी शिवरायांवर उत्तम असे संस्कार केले आणि यातूनच त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षीस्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज निर्माण केले.

6 जून 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेला विश्वास दिला. त्यांच्या मनात स्वातंत्र्याची बीजे पेरली. मावळ्यांची साथ घेत स्वराज्य निर्मिती केली. विधायक पद्धतीने शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची निर्मिती केली. त्यावेळच्या इतर शासकांचा राज्यव्यवहार हा जनतेवर जुलूम जबरदस्ती आणि इतरांवर आक्रमणाचा असा होता. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेपण आजही उठून दिसते आणि तब्बल साडेतीनशे वर्षांनंतरही त्यांचे नाव घेतले जाते.

जय भवानी जय शिवराय

➖➖➖➖➖➖◼️➖➖➖➖➖➖

भाषण क्र.4 छत्रपती शिवाजी महाराज जयंती-2024 छोटे भाषण

आज आपल्या शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करत आहोत त्यानिमित्ताने एकत्रित जमलेले आहोत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मी आज तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व माझे बाल मित्रांनो मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल ही नम्र विनंती करते

जिजाऊंसारख्या वाघिणीचा लेक होते ते

रयतेसाठी देव होते ते..

शत्रूसाठी तळपती आग होते..

अन् मुघलांचा बाप होते ते

शिवजयंतीनिमित्त शिवरायांना मानाचा मुजरा करुन मी माझ्या भाषणाची सुरुवात करते.

शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला. माता जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले. शिवरायांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर झाला होता आणि या गडावर असलेल्या शिवाई देवीमुळेच जिजाऊंनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले.

वयाच्या 14 व्या वर्षी शिवरायांनी पुण्याची जहागीर हाती घेतली आणि त्यानंतर शिवरायांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. शिवरायांनी हळूहळू शत्रूशी लढत एक-एक किल्ल्याचा ताबा घेण्यास सरुवात केली. 6 जून 1674 रोजी शिवरायांचा

राज्याभिषेक सोहळा पार पडला. 3 एप्रिल 1680 मध्ये आजारपणामुळे शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले.

अफझलखानाने शिवाजी महाराज यांना भेटण्याबाबत बोलणी सुरू केली. शिवाजी महाराज यांनी आपल्याला भेटण्यासाठी स्वतः एकट्याने यावे असा आग्रह अफझलखानाचा होता. मात्र, अफझलखान हल्ला करेल असा संशय शिवरायांना होता. त्यामुळे शिवराय जेव्हा अफझलखानाला भेटण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी अंगावर चिलखत घातले होते तसेच सोबत वाघनखे होती. अफझलखानाने जेव्हा शिवरायांना मिठी मारली आणि मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिवरायांनी आपल्याकडील वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढळा.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येयधोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत.

शिवाजी महाराज जयंती निमित्त केवळ वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करु नका. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या आचरणात आणणे गरजेचे आहे शिवजयंती वाजत गाजत नाही तर वाचनाने साजरी करायला हवी त्यांच्या विचार आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षात आणायला हवेत तरच आपण खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करू शकतो अशा या महान राजास माझा मानाचा मुजरा व विनम्र अभिवादन.