सर्व शाळांमधील विद्यार्थी/विद्यार्थीनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत school level child protection upay yojna Gr

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सर्व शाळांमधील विद्यार्थी/विद्यार्थीनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत school level child protection upay yojna Gr 

राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी/ विद्यार्थीनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत.

संदर्भ:- १)शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक, क्रमांक संकीर्ण १११७/ प्र.क्र.८०/ एस.एम.१, दिनांक ०५ मे, २०१७.

२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक, क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.३९/एसडी-४, दिनांक १० गार्च, २०२२.

३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्रमांक जिवायो-२०२१/प्र.क्र.४०/एसएम-४, दिनांक १३ मे, २०२२.

प्रस्तावना:

शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अलिकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बाबीची शासनस्तरावर गंभीर दखल घेण्यात येत आहे. वस्तुतः शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनासंदर्भात शासनस्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्याने, या उपाययोजनांशी तडजोड करता येणार नाही, अस्तित्त्वात असलेल्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

अ) शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे :-

1) शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे.

1) खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरिता या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिना कालावधीत शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक राहील. या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळांच्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल. यामध्ये प्रसंगपरत्वे शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारख्या मार्गांचा देखील अवलंब करण्यात येईल.

iii) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत, अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसविण्याबाबत कार्यवाही करावी. संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजना (DPC) अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान ५ टक्के निधी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयान्वये ज्या योजनांसाठी हा निधी वापरण्यास

मुभा आहे, त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. यात पायाभूत सुविधांचे निर्माण या घटकाचा देखील समावेश आहे. त्यामुळे या घटकांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ५ टक्के प्रमाणात राखीव ठेवण्यात आलेल्या निधीचा वापर करता येईल. अशी कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची असेल.

IM) शाळा व परिसरात केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे पुरेसे नसून, ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे. असे फुटेज तपासणे व काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापकाची व सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असेल. मुख्याध्यापकाने आठवड्यातून किमान तीन वेळा अशी तपासणी करणे आवश्यक राहील. याबाबत शाळेमध्ये कंट्रोल रूम असावी. मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली फुटेज तपासण्यात यावे, फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील.

ब) शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी :-

1) शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घेणे व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे यासाठी देखील उपाययोजना करणे आवश्यक आहे.

३) नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्यस्रोताद्वारे अथवा कंत्राटी पध्दतीने ज्या नेमणुका केल्या जातात जसे सुरक्षारक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कूल बसचे चालक, इ. बाबतीत संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनामार्फत होणे आवश्यक आहे. यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहील. नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देण्यात यावी.

ⅲ) शाळांमध्ये बाह्यस्रोताद्वारे अथवा कंत्राटी पध्दतीने शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करताना सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.

क) तक्रार पेटी :-

) शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याबाबत संदर्भ क्र. १ येथील शासन परिपत्रकान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन / क्षेत्रीय यंत्रणा यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तक्रार पेटी उघडण्याबाबत तसेच त्यात प्राप्त झालेल्या तक्रारीवर करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात सदर परिपत्रकान्वये सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि या तक्रार पेटींचा वापर सर्व शाळा प्रभावीपणे करीत आहेत किंवा कसे, याची तपासणी होणेदेखील तितकेच आवश्यक आहे.

1) सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता तक्रार पेटी बसविणे व त्यासंदर्भात संदर्भ क्र. १ येथील परिपत्रकातील तरतुदींचे पालन करणे अनिवार्य आहे. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकास व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल. यात कसूर झाल्याचे आढळून आल्यास मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

ङ) सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदींचे अनुपालन :-

शाळा, केंद्र, तालुका/शहर साधन केंद्र या स्तरांवर संदर्भ क्र. २ येथील शासन परिपत्रकान्वये सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आले आहे. सदर परिपत्रकान्वये या समितीने करावयाची कार्ये तपशीलवारपणे नमूद करण्यात आली आहेत. राज्यात प्रत्येक स्तरावर गठित करण्यात आलेल्या समित्यांनी त्यांना नेमून दिलेली कार्ये विहित कालावधीत पार पाडणे आवश्यक आहे. याबाबतचा आढावा विशेषत्वाने विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात घेणे महत्वपूर्ण आहे.

इ) विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रस्तावित गठन :-

१) शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत विशेषतः लैंगिक छळाबाबतचे अनुचित प्रकार अधूनमधून घडताना आढळून येतात. समाजाचा अशा घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संवेदनशील स्वरूपाचा असतो व अशा घटनांचे विपरित परिणाम विद्यार्थी, त्यांचे कुटुंबीय व संपूर्ण समाजावर देखील होत असतो. अशा अनुचित प्रकारांचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे.

i) ज्याप्रकारे कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैगिक छळाबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगाने POSH Act २०१३ या कायद्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्याचप्रकारे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकरणी अशा उपाययोजना होणे आवश्यक आहे. यासाठी शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन शिक्षणाधिकारी यांच्यास्तरावरुन एक आठवड्यात करावे, अशी समिती वेळोवेळी विद्यार्थ्यांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या समजावून घेऊ शकेल.

फ) राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती :-

1) उपरोल्लेखित अ, ब, क व ड येथे नमूद करण्यात आलेल्या उपाययोजनांचा राज्यस्तरावर आढावा घेण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती गठित करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे:-

i) उपरोक्त अ, ब, क व ड येथे नमूद करण्यात आलेल्या उपाययोजनांचा ठराविक कालावधीत आढावा घेणे आवश्यक आहे. गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांनी अनुक्रमे महिन्यातून एकदा व दोन महिन्यातून एकदा या उपाययोजनांचा आढावा घ्यावा, यासाठी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे व पालकांचे जबाब नोंदवावेत. याबाबतचा अहवाल राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीस सादर करावा.

॥ राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीने तीन महिन्यातून एकदा शैक्षणिक विभागनिहाय उपरोक्त उपायायोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घ्यावा व त्याबाबतचा अहवाल शासनास वेळोवेळी सादर करावा, याबाबतची जबाबदारी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांची राहील.

२. शाळेमध्ये विद्यार्थ्यासोबत अनुचित प्रकार घडल्याचे उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन / संस्था/मुख्याध्यापक/शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब चोवीस तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवावी. अशी अनुचित घटना कोणत्याही प्रकारे दडवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे निर्दशनास आल्यास, संबंधित व्यक्ती/संस्था गंभीर शास्तीस पात्र ठरतील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२४०८२११५१४३४५८२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

महाराष्ट्र शासनाने शालेय सुरक्षेसाठी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सखी सावित्री समिती स्थापन करण्यासंदर्भात स्पष्ट सूचना दिलेले आहेत यानुसार प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणे गरजेचे आहे ती बसवण्याची जबाबदारी शाळेने तसेच प्रशासनाने घेतलेली आहे या सर्व बाबींचा अहवाल शासनाकडे सादर करणे सर्व शाळांना बंधनकारक आहे शाळेतील अत्याचाराविषयीच्या वाढत्या घटना संदर्भात शासनाने मोठे पाऊल उचलले आहे प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक वर्ग खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक केलेले आहे शासन स्तरावर याबाबतची दखल घेतली गेलेली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच शालेय समिती याबाबत दखल घेणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे अडचण निर्माण होणार नाही तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षिततेची जाणीव करून देण्याची जबाबदारी शालेय प्रशासनाची असणार आहे.

यासाठी राज्यस्तरावरून सर्व जिल्हा परिषदांना शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना याबाबत जागृती करून देण्यात आलेली आहे प्रत्येक शाळेमध्ये या शासन निर्णयानुसार सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक आहे तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीस शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही याची देखील दक्षता घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे शालेय प्रशासनास साठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या दूर केल्या जाव्यात तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते संबंधित कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही.

विद्यार्थी पालक व शिक्षक मुख्याध्यापक यांनी समित्या स्थापन करून वेळोवेळी समित्यांचा अहवाल प्रशासनास सादर करणे बंधनकारक आहे तसेच पालक सभा बोलावून त्या सभेमध्ये पालकांना विद्यार्थ्यांना जागरूकत वाढवावी योग्य त्या सूचना कराव्यात तसेच अडीअडचणींसाठी त्यांना मदत देखील करावी वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे विद्यार्थ्यांना याबाबत जागृत करावे तसेच वेळोवेळी प्रशिक्षणाचे आयोजन करावे प्रशिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती घडवून आणावी प्रत्यक्ष शिक्षकाला प्रशिक्षण घेणे बंधनकारक करावे यासंबंधी शालेय स्तरावर राज्यस्तरावरून सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचनांचे प्रत्येकाने पालन करणे बंधनकारक असणार आहे. शाळेमध्ये सुचवलेल्या सर्व बाबी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्या बाबींचा योग्य वापर करून त्याचा प्रशासनाला वेळोवेळी अहवाल सादर करणे ही जबाबदारी शालेय स्तराची राहणार आहे.

शासन निर्णय pdf download 

सर्व शासकीय शाळांना सर्व शासन स्तरावरून सप्त सूचना देण्यात आलेले आहेत की प्रत्येक विद्यार्थ्यांची सुरक्षा ही खूप महत्त्वाची आहे सदर सुरक्षा करत असताना विद्यार्थ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात देखील गरजेचे असणार आहे सदर सुरक्षा ही प्रशासनाचे असणार आहे यामध्ये शासन शालेय व्यवस्थापन समिती सर्व देखरेख खाली होणार आहे यामध्ये शाळेमध्ये सीसीटीव्ही लावणे बंधनकारक असणार आहे सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे शासन स्तरावरून सक्त प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत यानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत विद्यार्थी हा सुरक्षित राहिला पाहिजे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर त्या अडचणी सोडवणे बंधनकारक असणार आहे शिक्षक मुख्याध्यापक आणि पालक यांच्या नुसार सर्व शिक्षकांना सुरक्षा मिळणे गरजेचे असणार आहेत सदर विद्यार्थ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची दक्षता घेणे सर्वा घटकांना बंधनकारक असणार आहे शाळेमध्ये कोणत्याही अनुभवान व्यक्तीस प्रवेश देणे बंधनकारक असणार आहे विद्यार्थ्यांची काळजी घेणे आता बंधनकारक असणार आहे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची काळजी घेणे क्रम प्राप्त असणार आहे शाळेमध्ये कुठल्याही प्रकारचे समानता ठेवणे गरजेचे असणार आहे शालेय परिसरामध्ये सीसीटीव्ही लावणे बंधनकारक केलेली आहे तसेच वरदानुसार सीसीटीव्ही लावणे बंधनकारक असणार आहे याचा निधी देखील शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे सदर परिपत्रकानुसार कार्यवाही करणे आता प्रशासनास बंधनकारक असणार आहे

सदर शासन निर्णयानुसार यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे देखील कार्य महत्त्वाचे असणार आहेत शालेय व्यवस्थापन समितीने देखील शाळेकडे व्यवस्थित लक्ष देऊन सर्व शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी यांच्या गरजा यांच्या अडचणी सोडवणे आता बंधनकारक असणार आहे शाळा व्यवस्थापन समिती हा महत्त्वाचा घटक आहे यामध्ये सर्वांनी सर्वांना विचारात घेऊन शाळेचा विकास करणे बंधनकारक असणार आहे शालेय परिसरामध्ये होणाऱ्या अळी अडचणी येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.